HW News Marathi
महाराष्ट्र

बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, निकाल कधी लागणार विद्यार्थ्यांचं लागलं लक्ष

मुंबई | महाराष्ट्रातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच रिझल्ट जाहीर झाला. यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाचं अपडेट हाती आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंडळाकडून सांगण्यात आलं आहे की, आयोजित करण्यात येणारी बारावी परीक्षा covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सामान्य परिस्थितीत रद्द करण्यात आली. त्यापूर्वी 2019 परीक्षेसाठी प्रवेश होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 3 एप्रिल रोजी ऑनलाइन प्रवेश पत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांची बैठक क्रमांक अवगत झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर सदरची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

कसा पाहाल आपला बैठक क्रमांक

मंडळाच्या http://mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर जा…

वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथं आवश्यक असलेली माहिती म्हणजे आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.

खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर आपलं नाव मग वडिलांचं नाव अशा स्वरुपात भरा

इंटर केल्यानंतर आपला रोल नंबर आपल्याला दिसेल

निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष

दहावीचा निकाल आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. 23 जुलैपर्यंत 12 वीचे निकाल बोर्डाकडे पाठवा अशा सूचना सर्व महाविद्यालयांना बोर्डाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही मुदत 24 जुलैपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पोस्टाने सुद्धा 25 जुलैपर्यंत शाळा निकाल बोर्डाकडे पाठवत होत्या. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आलेत त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. जुलै अखेर बारावीचा निकाल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. आता पूरपरिस्थितीमुळे निकाल लांबत असल्याची माहिती आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही’ उद्धव ठाकरेंचा इशारा!

News Desk

खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून आता लोकलच्या फेऱ्या ५०० पर्यंत वाढवणार

News Desk

आॅक्सिजन अभावी जवानाचा मृत्यू

News Desk