HW News Marathi
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांच्या अडचनीत वाढ, औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल

औरंगाबाद | पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंदुरीकर यांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायला ही याचिका दाखल करण्यात आली असुन या अगोदर संगमनेर जिल्हासत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता. त्यानंतर आता अनिस पक्षाने औरंगाबात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पुढील ८ आठवड्यानंतर याची पुढील सुनावणी होणार आहे.दरम्यान इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्षाला प्रतिवादी करण्यात आले आहे. मात्र आद्याप पर्यंत या संपुर्ण प्रकरनावर इंदोरीकर महाराजांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून एडवोकेट रंजना गवांदे यांनी आज औरंगाबाद न्यायालयामध्ये महाराजांच्या पुत्रप्रात्पी व्यक्तव्याबद्दल याचिका दाखल केल्याचे सांगितले आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी!

News Desk

पीएमजीपी वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय येत्या महिनाभरात! -मंत्री जितेंद्र आव्हाड

Aprna

“शिव पंख” लावून द्या, कामावर तरी जाता येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मनसेची खोचक टीका!

News Desk