HW News Marathi
महाराष्ट्र

सोनिया गांधींनी बोलावलेली बैठक संपली, शरद पवारांनी दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

मुंबई। मोदी सरकारवर विरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षातील समविचारी नेत्यांची चर्चा केली. या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधींशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला.सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षातील समविचारी पक्षांसोबत व्हर्चुअल बैठकीचे आयोजन केले होते. 15 पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

मोदी सरकार अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यास अपयशी

‘सोनिया गांधी यांनी चर्चेसाठी सर्व विरोधी पक्षांना बोलावले होते. ही बैठक सकारात्मक झाली आहे. या बैठकीमध्ये मी माझे मुद्दे उपस्थितीत केले. मोदी सरकार अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरली आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर जी लोकं विश्वास ठेवतात, जे लोकशाहीचे सिद्धांत वाचवण्यासाठी लढा देत आहे. त्यांना एकत्र घेऊन लढा दिला पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

प्राथमिकता ठरवून नियोजन करणे गरजेचं आहे

एक वेळबद्ध कार्यक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे. पण, आपण सर्व मुद्यांवर लढण्यापेक्षा प्राथमिकता ठरवून नियोजन करणे गरजेचं आहे. ज्यामुळे आपल्या देशाला एक चांगले भविष्यात देण्यासाठी काम करावे, असंही पवार म्हणाले.’अंतिम लक्ष्य 2024 लोकसभा निवडणुका आहेत. ज्यासाठी पद्धतशीर नियोजन करावे लागेल. हे एक आव्हान आहे पण एकत्र आपण ते करू शकतो कारण पर्याय नाही. प्रत्येकाची स्वतःची अडचण असते पण राष्ट्रहिताची मागणी असते की आपण सर्वांनी आपल्या अडचणीवर बाजूला सारून पुढे आले पाहिजे, असंही पवार म्हणाले.

अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते

‘शरद पवार यांनी सहकार मंत्रालयाचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला, तो राज्य सरकारच्या घटनात्मक अधिकार आणि जबाबदाऱ्यांमध्ये हस्तक्षेप आहे’ असा आरोपही पवारांनी केला.या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. तसंच, या बैठकीला राहुल गांधी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सहभागी झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या! – रावसाहेब पाटील-दानवे

Aprna

“कुणी कुणाला जोडे मारायचे आणि कुणी कुणाला…”,फडणवीसांची त्या लेटरवर पहिली प्रतिक्रिया

News Desk

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

swarit