HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : सीएए, एनआरसीविरोधातील ‘मुंबई बाग’ आंदोलन तूर्तास स्थगित

मुंबई | दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा येथे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसीविरोधात आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. गेल्या दीड महिन्यापासून मुंबई बागमध्ये आंदोलन सुरू होते. देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेत मुंबई बाग आंदोलन आज (२३ मार्च) स्थगित केले आहे. मात्र, आंदोलक महिलांनी आंदोलन स्थळावरून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे आंदोलन बंद किंवा स्थगित झाले, हे देखील आंदोलकांनी नमूद केले आहे. देशातील कोरोनाचे संकट पाहाता आंदोलन स्थिगत केल्या निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कलम १४४ (जमाव बंदी) ३१ मार्च पर्यंत लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२२ मार्च) जाहीर केला आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी मोठे पाऊल उचलेले आहे. नागरिकांनी गरज नसले तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई बागमधील आंदोलन स्थिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई बागमध्ये वृद्ध नागरिक, लहान मुले आणि महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होता.

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये समंत होण्यापूर्वीपासून दिल्लीच्या शाहीनबागमध्ये आंदोलन सुरू होते. मात्र, यानंतर संपूर्ण देशभरात सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. दिल्लीच्या शाहीनबागमधील सीएए आणि एनआरसीवरील आंदोलन सुरू आहे. मात्र, मुंबई बागेतील आंदोलक स्थिगत केले आहे. देशासह राज्यात सध्या कोरोनाग्रतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३९३ वर गेली तर राज्यात ८९ कोरोना बाधिकांचा आकडा गेला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, आदित्य यांना जवळ करत उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना टोला

News Desk

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

News Desk

फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय महाराष्ट्र सरकारने केला रद्द

News Desk