HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारकडून आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगाऱ्यांना मिळणार पेन्शन

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२५ जून) विधानसभेत आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगाव्या लागणाऱ्यांना सरकारकडून पेन्शन आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. २५ जून १९७५ रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती.

आणीबाणीच्या काळात जे लोक तुरुंगात गेले होते त्यांना पेन्शन आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. अनेकांनी तेव्हा ही पेन्शन नाकारली. मात्र तेव्हा नोकऱ्या गमावणारे अनेकजण आता गरिबीत जगत आहेत. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन राज्य मंत्री मदन येरावर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आतापर्यंत ३ हजार २६७ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे ज्यांना आणीबाणीच्या काळात एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला त्यांना मासिक ५ हजार आणि एक महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेल्यांना १० हजार पेन्शन देण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत निवडणूकीची रणधुमाळी होणार सुरू भाजपला सत्ता टिकवण्यासाठी करावी लागणार धावाधाव

News Desk

बीडमधील वडवणीत नगरपंचायतच्या मतदान केंद्राबाहेर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Aprna

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk