HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाही, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात म्हटले होते. परंतु, अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज (२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला. उद्यापासून (३ मार्च) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे

फडणवीस म्हणाले, “राज्यात आज अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आम्ही अर्थसंकल्पी अधिवेसनात चर्चा करण्यासाठी तयार असून राज्यातील अनेक मुद्दे मांडण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, महाविकासआघाडी सरकारने नीट सहकार्याने हे अधिवेशन चालयला हवे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात म्हटले होते की, तकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत, असा शब्द दिला होता. परंतु, मीटर कापावे लागतील असे ते शेवटच्या दिवशी म्हणाले.यामुळे आता अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे, असे ते म्हणाले. 

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. मलिकांच्या मुद्द्यावर फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर घेरले. फडणवीस म्हणाले, “मुंबईच्या खुन्यासोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला पाठिशी घालत महाविकासआघाडी सरकार काय करते?, महाराष्ट्र मुंबईच्या खुन्यासोबतच आर्थिक व्यवहार कधीच खपवून घेणार नाही, असा सवाल त्यांनी उपस्थिती केला आहे. 

मविआमुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले 

मराठा आरक्षण हे महाविकासआघाडी सरकारमुळे केल्याचा आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे. यामुभे संभाजीराजे यांना संभाजीराजेंना उपोषण करावे लागते हे महाविकासआघाडी सरकारचे अपयश आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला अधिवेशनात घेरणार असल्याची कल्पना फडणवीसांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीत, नेमकी काय झाली चर्चा?

News Desk

आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवारांचा विरोध!

News Desk