HW News Marathi
महाराष्ट्र

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ७ ते १० मे दरम्यान विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान

पुणे ४०.२, लोहगाव ४१.३, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४४.४, नाशिक ३९.३, सांगली ३९.९, सातारा ४१.१, सोलापूर ४२.६, मुंबई ३४.२, सातांक्रूझ ३४, अलिबाग ३६.४, रत्नागिरी ३३.४, पणजी ३५.१, डहाणू ३४.७, औरंगाबाद ४१.६, परभणी ४४, अकोला ४५.१, अमरावती ४४, बुलडाणा ४१.५, ब्रह्मपुरी ४५.१, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४२.५, नागपूर ४३.७, वर्धा ४४.९, यवतमाळ ४३.५

मुंबईत दिवसा उन व रात्री उकाडा

मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुंबई तापत आहे. उष्ण, कोरडे वारे मुंबईकरांना तापदायक ठरत असून, ऊकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. दिवसा ऊनं आणि रात्री ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबई त्रस्त आहे. सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा, भाजप उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी

News Desk

गेल ऑम्वेट यांचं आज निधन!

News Desk

‘मनसे-भाजप युतीवर उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही’, विनोद तावडेंचं वक्तव्य

News Desk