HW News Marathi
महाराष्ट्र

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ७ ते १० मे दरम्यान विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान

पुणे ४०.२, लोहगाव ४१.३, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४४.४, नाशिक ३९.३, सांगली ३९.९, सातारा ४१.१, सोलापूर ४२.६, मुंबई ३४.२, सातांक्रूझ ३४, अलिबाग ३६.४, रत्नागिरी ३३.४, पणजी ३५.१, डहाणू ३४.७, औरंगाबाद ४१.६, परभणी ४४, अकोला ४५.१, अमरावती ४४, बुलडाणा ४१.५, ब्रह्मपुरी ४५.१, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४२.५, नागपूर ४३.७, वर्धा ४४.९, यवतमाळ ४३.५

मुंबईत दिवसा उन व रात्री उकाडा

मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुंबई तापत आहे. उष्ण, कोरडे वारे मुंबईकरांना तापदायक ठरत असून, ऊकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. दिवसा ऊनं आणि रात्री ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबई त्रस्त आहे. सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवाब मलिकांच्या घरी पहाटे ED अधिकारी; दाऊद मालमत्तेच्या व्यवहारासंबंधी कार्यलयात चौकशी सुरू

Aprna

“आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू दौऱ्यावर, आजोबांचा सल्ला फडणवीस आणि राज्यपालांसाठी?”

News Desk

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या,मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी!

News Desk
राजकारण

वनगांची उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत

News Desk

मुंबई : भाजपाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलेले दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळणार की नाही या बाबत अद्याप शिकामोर्तब झालेले नाही. श्रीनिवास वनगा लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे. परंतु शिवसेनेने मात्र अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे वनगांना उमेदवारी मिळणार का असा संभ्रम निर्माण झाला आहे.

पालघर पोटनिवडणुकीसंदर्भात ‘मातोश्री’वर चर्चा सुरु होती. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली. परंतु या बैठकीनंतरही शिवसेनेने श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना निवडून आणू असा विश्वासही शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला आहे.

Related posts

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

News Desk

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

News Desk

“सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Aprna