HW News Marathi
Covid-19

देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी-प्रशासनाचा एकमताने निर्णय

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांसंदर्भात अखेर तोडगा निघाला आहे. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याचा वारकरी आणि प्रसासनाने एकमताने निर्णय घेताल आहे. आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या निर्णयनंतर ठरवण्या येण्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यामध्ये आज (२९ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती वारकऱ्याची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी कशा पद्धतीने पार पाडायची यांदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेनतंर आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. यात बैठकीत आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.

कोरोनामुळे राज्यात सण घरीच साजरा करण्याचे राज्य सरकारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सरकार इतर वाहन किंवा विमान उपलब्ध करणार आहे. पालखी बरोबर कमीत कमी वारकरी असतील. पादुकांचं प्रस्थान अष्टमीला होईल, दशमीला पंढरपूर जाईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची घेतली भेट..

Arati More

#Coronavirus : जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk

आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजारांवर

News Desk