HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर संसार मोडला, गिरीश महाजन यांची गुलाबराव पाटलांच्या घरी लग्नसोहळ्यात खंत”

जळगाव। नुकताच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. आणि या लग्नसोहळ्यात आजी-माजी मंत्री सर्वच पक्षातील मंत्र्यांनी हजेरी लावली होती. परंतु लग्न सोहळ्यातही एकमेकांना टार्गेट करायची संधी या नेत्यांनी सोडलेली नाही. यावेळी एकमेकांवर टीका करताना सत्ताधारी आणि विरोधक असा सूर दिसत होता. राज्यात सत्तेत असलेल्या सरकारला आधी गिरीश महाजन यांनी टोला लावला, त्यानंतर महाजन यांना राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी मात्र चांगलेच प्रत्युत्तर दिलंय.

सत्तेपासून दूर असल्याची खंत

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याच्या कारणावरून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आमचा 25 वर्षांचा संसार होता तो तुम्ही मोडला, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील, असंही महाजन म्हणाले. यावेळीही भाजपची सत्तेपासून दूर असल्याची खंत चांगलीच जिव्हारी लागल्याची खदखद या वेळीही दिसत होती. मात्र यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले.

आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावात जाऊन उत्तर देताना राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत. गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाजन यांनी आज संसार जुळत असताना, आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे, ते अपशब्द बोलतात. असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपकडून या सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याला तशीच प्रत्युत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली. गुलाबराव पाटलांच्या मुलाचे लग्न जरी कौटुंबीक कार्यक्रम असला तरी तिथे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्यानंतर एकमेकांवर विखारी टीका केलेली पहायला मिळाली.

या मंत्र्यांची होती उपस्थिती?

चोपडा तालुक्यातील साईबाबा मंदिरात हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला आहे. लग्नसोहळा साधा असला तरीही या सोहळ्यात महा विकास आघाडीतील 14 मंत्री उपस्थित राहणार आहेत. यात छगन भुजबळ, जयंत पाटील,अब्दुल सत्तार, उदय सावंत,नवाब मलिक,

बाळासाहेब थोरात, सुनील केदार, आदिती तटकरे, संदिपान भुमरे, जितेंद्र आव्हाड, संजय बनसोडे आदी मान्यवरांची या सोहळ्यासाठी खान्देशात हजेरी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार”, हर्षवर्धन पाटील आणि उदयनराजेंमध्ये झाली चर्चा

News Desk

“असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?”

News Desk

पंढरपूरच्या पायी वारीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात!

News Desk