HW News Marathi
महाराष्ट्र

‘जांब समर्थ’ राम मंदिरातून समर्थ रामदासांनी स्थापित केलेली मूर्ती चोरीला

मुंबई | जालना येथील समर्थ रामदासांचे (Samarth Ramdas) जन्मगावी ‘जांब समर्थ’तील राम मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या मंदिरातील 450 वर्षापूर्वीची मूर्तीं आज (22 ऑगस्ट) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अज्ञाताकडून चोरी गेल्याची घटना घडील आहे.  या मंदिरातील पंतधातूंची ऐतिहासिक मुर्ती चोरीला गेल्या आहेत. ही मूर्ती समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती सुद्धा चोरीला गेली असून यात राम लक्षण, सीता, भरत आणि शत्रूघ्न मूर्ती चोरीला गेल्या आहेत.

पोलिसांना मंदिरातील मुर्ती चोरी झाल्याचा अंदाज आज  3 वाजताच्या सुमारास चोरी गेल्याची घटना घडली. ही चोरी मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. या घटनेची माहिती मिळातच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली आहे. या प्रकरणाचे पडसाद  पावसाळी अधिवेशनाचा आज (22 ऑगस्ट) सभागृहात पडलेले पाहायला मिळाले.

मूर्ती चोरीचे विधानसभेत पडसाद पडले

विधानसभेत माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांनी चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. टोपे सभागृहात म्हणाले, “आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास चोरांनी जांब समर्थ येथे मंदिरातील मुर्त्यांची चोरी केली. समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरात मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. राज्य सरकारने या मंदिराला ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले, “मला आज सकाळी याबद्दल माहिती मिळाली आहे. यासंदर्भात मी डीजींशी तात्काळ बोल बोलणी केली असून या प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींना पकडून मुर्त्या परत आणण्याचे आदेश दिले आहे,” असे ते म्हणाले.

 अशी झाली चोरी

सकाळी जेव्हा 4. 30 वाजता पुजाऱ्यांच्या लक्ष्यात आले. यानंतर पुजाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि संरपंच त्यांना कळविण्यात आले. यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या चोरीतील एक घटना अधोरेखित करण्यासारखे म्हणजे मंदिराची चावी घेऊन गंर्भघृहाचा दरवाजा उघडून या मूर्ती चोरी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराच्या गंर्भगृहाची चावी कुठे ठेवली जाते. पुजारी केव्हा येतो, सगळी वेळी चोरांना माहिती होती. त्या व्यतिरिक्त दोन ते तीनच्या सुमारास वीज गेली होती. याचा फायदा घेत आणि पुजारी 4. 30 वाजता येत असतो. हा सर्व घटनाक्रम पाहिला तर चोर हा जवळचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. यावर पोलिसांनी देखील लक्ष घालत असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे देखील पोहचले आहे. पोलिसांनी संपूर्ण मंदिर परिसर घेरले आहेत. यासाठी श्वान पथक देखील दाखल झाले असून चोरांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पंचधातूच्या अशा मोल्यवान मुर्त्या चोरीला गेल्या आहेत. ऐतिहासिक ठेवा चोरीला गेल्यामुळे पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

प्रशासनानी लवकरात लवकर मुर्तींचा शोध लवावा – समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी

450 वर्षाच्या प्राचीन मुर्ती चोरीला गेलेल्या आहेत, यासंदर्भात समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले, “समर्थांची ही जन्म भूमी आणि ज्या ठिकांणी समर्थांचा जन्म झाला. त्या ठिकाणी हे राम मंदिर आहे. आणि हे अतिशय प्राचीन असणारे राम मंदिर आणि या ठिकाणी असणाऱ्या राम मूर्ती या राम मूर्तीचे स्वत: समर्थांचे पूजन केले. खरे तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अशा प्राचीन मूर्तींना समर्थांचा स्पर्श झाला आहे. आणि त्या मुर्तीची अशी चोरी झाली. हे अत्यंत खेदकारक आहे. माझी प्रशासनाला नम्रतापूर्वक विनंती आहे. आपण लवकरत लवकर या मुर्तींचा शोध लावावा. खरे तर याला ब वर्गचा दर्जा दिला आहे. याला अ वर्गाचा दर्जा देऊन आपण लवकरात लवकर या आमच्या अधिष्ठानाचे खरे तर आमचे सांप्रदायिक अधिष्ठान आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगरांना धमकीचा फोन’, तर चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी

Ruchita Chowdhary

राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्र: खा. शरदचंद्र पवार

News Desk

गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या निधी चौधरीविरोधात कारवाई करा | शरद पवार

News Desk