HW News Marathi
महाराष्ट्र

२५ वर्षांनंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास!

नवी दिल्ली। मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझा देशातील तरुणांवर, शेतकरी सर्वांवर विश्वास आहे. प्रत्येक लक्ष्य ते संपादन करू शकतात. आजपासून २५ वर्षांनी २०४७ मध्ये जेव्हा १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा जे कोणी पंतप्रधान असतील ते आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख करतील तो संकल्प आज देश करत आहे. हा माझा विश्वास आहे. २५ वर्षांनंतर ध्वजारोहण करताना हीच गौरवगाथा गायली जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी व्यक्त केला.

नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदींनी यावेळी भाषण करताना आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी तसेच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी गरिबांसाठी मोफत तांदूळ, भविष्यातील वाटचाल, शिक्षण योजना अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. मुख्यत्वे यावेळी त्यांनी रोजगार निर्मितीसाठी पॅकेज आणि नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली.

दहशतवाद आणि दुसरा विस्तारवाद

आज संपूर्ण जग भारताला नव्या दृष्टीने पाहत आहे. एक म्हणजे दहशतवाद आणि दुसरा विस्तारवाद. भारत या दोन्ही आव्हानांशी लढत आहे. पूर्ण हिमतीने उत्तरही दिले जात आहे, असेही यावेळी ते म्हणाले. नवी शिक्षण योजना गरिबीसोबत लढण्यासाठी असून मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देईल, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

भारताकडे स्वत:ची लस नसती, तर काय झाले असते?

मोठी लसीकरण मोहीम देशात

भारताला लसीसाठी इतर कोणत्या देशावर अवलंबून राहावे लागले नाही. तुम्ही कल्पना करा की जर भारताकडे स्वत:ची लस नसती, तर काय झाले असते? पोलिओची लस मिळवण्यात आपली किती वर्षे निघून गेली. एवढ्या संकटात जगात महामारी असताना आपल्याला लस कधी मिळाली असती? पण आज गर्वाने सांगता येतेय की जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. ५४ कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त बळ देण्यासाठी पाउल

सहकारवाद ही आपली प्रेरणा आहे. सहकारवाद आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक आहे. सहकारवादाचं सशक्तीकरण व्हावे म्हणून विशेष मंत्रालय तयार करण्यात आले आहे. सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त बळ देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले आहे.

सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश

मला लाखो मुलींचे संदेश मिळायचे की त्या देखील सैनिक शाळांमध्ये शिकू इच्छितात. त्यांच्यासाठी देखील सैनिक शाळांचे दरवाजे उघडले जावेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांमध्ये पहिल्यांदा आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग सुरू केला होता. आता सरकारने ठरवले आहे की देशातल्या सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडले जाईल. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील, असे मोदी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी आयोग, महामंडळाचं अध्यक्षपद का?” | मलिक

News Desk

कोरोनावर आजवर केलेली मेहनत फटाक्यांमुळे वाया घालवू नका, मुख्यमंत्र्यांचे दिवाळीनिमित्त आवाहन

News Desk

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार 

News Desk