HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील ही अनैसर्गिक युती फार काळ टिकणार नाही !

मुंबई | “महाराष्ट्रात ही अनैसर्गिक युतीची सत्ता आहे. अशी सत्ता जास्त काळ टिकत नाही. या सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध आहे”, असे म्हणत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “आम्ही महाविकासआघाडी सरकारकडे लक्षच देत नाही. त्यांच्यातच प्रचंड अंतर्विरोध आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. हे असे सरकार थोडे दिवस चालेल आणि एक दिवस जाईल. त्यामुळे ते काय म्हणतात ? त्याला महत्त्व नाही. ही अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी टिकत नाही”, अशी बोचरी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. येत्या ७ आणि ८ सप्टेंबर अशा २ दिवसांचे हे अधिवेशन होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीनंतर या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, विधिमंडळाचे हे अधिवेशन आता काहीच दिवसांवर असताना विरोधी पक्ष आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, फडणवीसांकडून पुन्हा एकदा महाविकासआघाडीवर जोरदार टीकेला सुरुवात झाली आहे. “हे सरकार जितके दिवस चालायचे तितके दिवस चालेल आणि एक दिवस जाईल. देशाच्या राजकारणात अशी अनैसर्गिक युती कधी फारशी टिकली नाही”, असे फडणवीस म्हणतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk

संपावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

News Desk

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू कोयत्याने पुसणारी आमची अवलाद नाही | पंकजा मुंडे

News Desk