HW News Marathi
महाराष्ट्र

यंदा विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार!

मुंबई। राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी नागपूरला होतं. पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईतच झालं होतं. त्यानंतर यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती तसेच विधान परिषदेची निवडणूक यामुळे यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवलं जाणार असल्याची चर्चा होती.आणि अखेर हे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

पहिले ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार

राज्यात १ डिसेंबरपासून इयत्ता पहिले ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परंतु, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू होत्या. शाळांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच राज्यात इयत्ता पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सरसकट सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

swarit

साताऱ्यात ‘नारळफोड्या गॅंग’; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

News Desk

भाजपची जनआशिर्वाद नसून ‘जनअपमान यात्रा’ – महेश तपासे

News Desk