HW News Marathi
महाराष्ट्र

SushantSinghCase : ज्यांनी महाराष्ट्राची आणि पोलिस दलाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या नाही तर त्याने आत्महत्याच केली हे आता एम्सच्या विशेष अहवालात समोर आले आहे. त्यावरुन ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यांनी तोंड न लपवता माफी मागावी, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

“बिहार निवडणुकीसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरलं गेलं. त्यामुळं मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे”, असा टोला लगावत ज्यांनी महाराष्ट्राची व महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, असं रोहित म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk

प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या वकिलपत्राचा राजीनामा; गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

Aprna

मुला- मुलींच्या सम-विषम वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता

News Desk