HW News Marathi
महाराष्ट्र

“पटेल स्टेडियमचे नाव बदलणाऱ्यांनी औरंगाबादच्या नामांतराबद्दल बोलू नये”, मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले

मुंबई | औरंगाबादचे नाव संभाजीनगर कधी करणार अशी विचारणार भाजप सतत करत आहे. पण ज्यांनी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिले आहे, त्यांनी आम्हाला विचारू नये, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना आज (३ मार्च) सभागृहात लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण करत भाजपच्या नेत्यांना चांगलेच झोडपून काढले. भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडले.

‘सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्यात आले आहे आणि आपले नाव दिले आणि आम्हाला विचारत आहात, औरंगाबादला संभाजीनगर द्या, पण आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर हे नक्की करूच, पण त्याआधी या विधानसभेत संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचे ठरले होते, त्याची तारीख कधी दिली जाणार आहे हे सांगा, उगाच आम्हाला हिंदूत्व शिकवू नका’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आणखी किती काळ आरक्षण चालणार आहे?”, असा सवाल न्यायालय विचारु कसं शकतं?

News Desk

विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार! – विजय वडेट्टीवार

Aprna

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव

Aprna