HW News Marathi
महाराष्ट्र

महडमध्ये प्रसादातून विषबाधा तीन बालकांचा मृत्यू

रायगड | रायगड मधील महडमध्ये पूजेसाठी केलेल्या प्रसादातून 80 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. खालापूर तालुक्यातील महडमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. महडमध्ये माने कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता त्यासाठी पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मात्र कार्यक्रमानंतर घरी परतलेल्या गावक-यांना आणि नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.

ही बाब लक्षात आल्यानंतर या सर्वांना जवळ असलेल्या खोपोलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असुन जवळपास 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. रुग्णांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले असून त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई करू नये, सरनाईकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

News Desk

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध – धनंजय मुंडे

News Desk

राज्यात काल 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त!

News Desk
मुंबई

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk

उल्हासनगर | पोलिसांसमोर एकमेकांवर चाकू आणि तलवारी उगारणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या विकास शिरसाठ आणि नेहा शिरसाठ या पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावले होते. महिला तक्रार निवारण कक्षात दोघांची बोलणी सुरु असतानाच अचानक पुन्हा वाद उफळला.

दोन्ही पती-पत्नी सोबत आलेले आठ ते दहा जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतक्यावरच न थांबता त्यांनी चक्क एकमेकांवर चाकू आणि तलवारीही उगारल्या. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोन्ही गटांच्या नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन चाकू आणि तीन तलवारी जप्त केल्या आहेत.

 

Related posts

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

swarit

डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी

News Desk

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

News Desk