HW News Marathi
महाराष्ट्र

महडमध्ये प्रसादातून विषबाधा तीन बालकांचा मृत्यू

रायगड | रायगड मधील महडमध्ये पूजेसाठी केलेल्या प्रसादातून 80 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. खालापूर तालुक्यातील महडमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. महडमध्ये माने कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता त्यासाठी पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मात्र कार्यक्रमानंतर घरी परतलेल्या गावक-यांना आणि नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.

ही बाब लक्षात आल्यानंतर या सर्वांना जवळ असलेल्या खोपोलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असुन जवळपास 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. रुग्णांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले असून त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया – संदीप देशपांडे

News Desk

शैक्षणिक संस्थेत आर्थिक गैरव्यवहार

News Desk

पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंनी काँग्रेस महासचिवांना निलंबित केलं!

News Desk