HW News Marathi
महाराष्ट्र

उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू

बीड | जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भतानवाडीमध्ये गावात हिटरचे उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. तर यात एक महिलाही गंभीर भाजली आहे. सकाळी पाणी गरम करण्यासाठी ठेवले असता अचानक वीज गेली ज्यामुळे सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटण तसेच सुरु राहीले.

मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हिटर सुरु झाला त्यातच हिटरच्या स्टुल खालचा आधार सरकला आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. उकळते पाणी अंगावर सांडल्याने मुलींचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मुलींची मामी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात भाजपचे सरकार होऊ नये !

News Desk

‘मुंबईमध्ये ड्रोन द्वारे जंतूनाशक फवारणी!’

News Desk

राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar