HW News Marathi
महाराष्ट्र

तिवरे धरण : ११ जणांचा मृत्यू, तर १३ जण बेपत्ता

रत्नागिरी | चिपळूणमधील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. एनडीआरएफसह स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध व मदतकार्य सुरू आहे. मंगळवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारा तिवरे धरण फुटले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सात गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले. या दुर्घटनेत तिवरेतील भेंडेवाडीला मोठा तडाखा बसला आहे.

आतापर्यंत आत्माराम धोंडू चव्हाण (७५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५५), दशरथ रविंद चव्हाण (२०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धावडे (१८) यांच्यासह ११ जणांचे मृतदेह हाती लागले असून १३ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एका मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजी, काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर सोनिया गांधींचीही घेणार भेट

Aprna

आपली खरीप पिकं आता सुरक्षित राहणार !

News Desk

“आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नाही”!

News Desk