HW News Marathi
देश / विदेश

आर्थिक झळ राजभवनापर्यंत, राज्यपालांच्या खर्च कपातीच्या सूचना

मुंबई | देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. राज्यांवर देखील आता हा आर्थिक ताण पडायला सुरुवात झाली आहे. ही आर्थिक झळ आता राजभवनापर्यंत पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी आता राज्यपालांकडून राजभवन प्रशासनाला काही उपाययोजना राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राजभवनात खर्चात कपात करण्यासाठी, या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून राजभवनाच्या खर्च १० ते १५ % कपात होईल असे म्हटले जात आहे.

राजभवनातील खर्च कपातीसाठी राज्यपालांच्या उपाययोजना :

* राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू न करता केवळ चालू कामेच पूर्ण करावी.

* पुढच्या आदेशांपर्यंत राजभवनात येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतीचिन्ह देऊ नये.

* पुढील आदेशापर्यंत राजभवनात कोणतीही नवी नोकरभरती करू नये.

* स्वातंत्र्यदिनी पुण्यातील राजभवन येथे होणारा राज्यपाल आयोजित स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा.

* राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा.

* अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी.

* राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.

* कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

Aprna

आमचे मित्र चुकले आणि दिल्लीला गेले – अशोक गेहलोत

News Desk

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शिवसेनेने १०० जागांवर लढण्याचे दिले संकेत

News Desk