HW News Marathi
महाराष्ट्र

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. स्त्री शिक्षणाच्या जनक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८८ वी जयंती देशभरात साजरी होत आहे.

सावित्रीबाईंविषयी थोडक्यात

सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा तालुक्यात ३ जानेवारी १८३१ साली झाला. सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.१८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालविल्या देखील. आजच्या काळात महिलांना शिक्षण घेणे सहज शक्य होते यामध्ये सावित्रीबाई यांची महत्वपुर्ण भूमिका आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

‘राजीनामा सत्र अद्यापही सुरूच’, ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मस्के मुंबईकडे रवाना!

News Desk

रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणार! – राजीव चंद्रशेखर

Aprna