HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

मुंबई । राज्यातील कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सातत्याने वाढणाऱ्या या आकड्यामुळे शासन-प्रशासन कडक पावले उचलण्याची शक्यतासुद्धा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज (12 मार्च) नव्या तब्बल 15 हजार 817 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पुन्हा काही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत नवीन 11 हजार 344 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 21 लाख 17 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आता 92.79% इतका झाला आहे. त्यामुळे, राज्य सरकार ही नियंत्रणात आणण्यासाठी कोणते नवे निर्बंध लागू करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहंकार सोडा, संपूर्ण देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा !

News Desk

देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू

News Desk

ICMRच्या यादीमध्ये ‘कोरोनिल’चा साधा उल्लेख नाही, तरीही केंद्रीय मंत्री निर्धास्तपणे वाटताहेत बाबा रामदेवांचं ‘हे’ औषध

News Desk