HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेत्यांची आजची बैठक रद्द, ‘हे’ आहे कारण 

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांची नाराजी आता अगदी उघड झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची गुरुवारी (११जून) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर आज (१५ जून) काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार होती. बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण काँग्रेसमधील नाराजीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांची आजची ही बैठक रद्द झाली असून ही बैठक आता उद्याच (१६ जून) होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे आज वयाच्या ७८व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. याच कारणास्तव, आजची मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेसची ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

महाविकासाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याने ही नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (११जून) महाराष्ट्र काँग्रेसची तातडीची बैठक झाली. दरम्यान, या बैठीकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.“नक्कीच काही मुद्दे आहेत. काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत या विषयावर चर्चा करणार होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्र्यांनी वायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर केले भाष्य…

News Desk

अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत !

swarit

शिवसेना नेते संजय राठोड पोहरादेवीला रवाना

News Desk