HW News Marathi
Covid-19

आजची राज्य मंत्रिमंडळ बैठक वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई । राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्दे गाजत आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आज (२७ मे) होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वपूर्ण ठरते. दुपारी ३.३० वाजता या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल. मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्याची तीव्र मागणी, पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसने घेतलेली टोकाची भूमिका, तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत गेल्या काही दिवसांमध्ये झालेले वाद ह्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका, त्यासाठीची संपूर्ण तयारी आणि उपाययोजनांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पदोन्नती आरक्षण रद्द केल्याने काँग्रेस आक्रमक पवित्र्यात आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दाही आव्हानात्मक आहे आणि या सगळ्यात सरकारअंतर्गत नाराजी, कुरबुरी चव्हाट्यावर यायला देखील सुरुवात झाली आहे. थोडक्यात एकंदर तिन्ही पक्षांतील नाराजी पाहता विविध विषयांवर तोडगा निघणार की मतभेद चिघळणार हे पाहणे आवश्यक आहे.

सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही !

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे, महाविकासआघाडीतील वाद पेटणार की सामोपचाराने निर्णय घेतले जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : अबब…एका महिन्यात कमावले साडे चार लाख रुपये !

News Desk

पुण्यात ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार ! महापौर मोहोळ

News Desk

लहान मुलांसाठी मॉडर्ना कंपनी लवकरच 50 मायक्रोग्राम मात्रेच्या लसींची करणार निर्मिती

News Desk