HW News Marathi
महाराष्ट्र

आज पुन्हा भारत बंद

दलित संघटनांनी २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंद नंतर मंगळवार १० एप्रिल रोजी पुन्हा एकदा काही दलित संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. २ एप्रिल रोजी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले होते त्याच्या निशेधार्थ पुन्हा दलित संघटनांकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

या बंद दरम्यान कोणत्याही प्रकारच्या हिंसक घटना घडू नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विषेश काळजी घेण्यात आली आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये संवेदनशील जागांवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

विषेश म्हणजे २ एप्रिल रोजी ज्या ठिकाणी बंदला हिंसक वळण प्राप्त झाले होते तिथे विषेश सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे. दरम्यान कोणत्याही राज्यात बंदला हिंसक वळण प्राप्त झाल्यास त्याला त्या विभागाचे जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक जबाबदार असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

“आधी राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा, नंतर भुजबळांचा बाप काढला” शिवसेना खासदाराचा राग अनावर!

News Desk

कोचिंग क्लास पुन्हा सुरू करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार

News Desk
मुंबई

रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी अंधारात

News Desk

मुंबई | वरळीची माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी गेल्या महिनाभरापासून अंधारात आहे. या ठिकाणी विजेच्या दिव्यांची सोय नसल्यामुळे गेल्या महिनाभरापासून लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी पुरता प्रकाश मिळत नसल्यामुळे लोकांना मोबाईल टॉर्च च्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

या समस्येला त्रासलेले वरळीर सध्या स्मशानभूमीत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. सध्या या स्मशानभूमीचा वापर वरळी कोळीवाडा ते प्रभादेवी, डिलाईल रोड ते दिपक टॉकीज परिसरात रहाणारे रहिवाशी करतात. या ठीकाणी असलेले तीनही लाईटचे पोल बंद आहेत काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसात हे विजेचा प्रवाह बंद असल्याचे पहायला मिळत आहे. या बाबत महापालिकेकडे तक्रार करुनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी मोबाईल टॉर्च च्या उजेडात लोकांना अंत्यसंस्कार करावे लागतात ही बाब अत्यंत वाईट आहे.

विज नसल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वीद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यात यावा. आठमहिन्यापूर्वी स्मशानभूमीत प्रकाश पडावा अशा लाईटची सोय स्मशानभूमीत करण्यात आली होती. प्रशांत सकपाळे तेव्हा जी साऊथ ला सहायक आयुक्त होते. सध्या विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे कारण या पोलला विद्युत पुरवठा करणारी केबल ब्रेक झाली आहे.

परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या समस्येला वरळीकरांना सामोरे जावे लागत आहे. येत्या २ दिवसात जर विजेचे दिवे सुरु झाले नाहीत आणि विद्युत पुरवठा सुरळीत सुरु झाला नाही तर शिवसेना आंदोलन करेल असा इशारा वरळी विधानसभेचे युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटिल यांनी दिला आहे.

Related posts

…तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा !

News Desk

उंदीर घोटाळ्यानंतर चहा घोटाळा उघडकीस

News Desk

यावर्षी व्हाईट हाऊसमध्ये झाली नाही ईद साजरी

News Desk