HW News Marathi
महाराष्ट्र

“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”, तुषार भोसलेंचा सरकारला सवाल

मुंबई | मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. राज्य सरकारवर विरोधी पक्ष हणून टीका करत आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मंजुरी देत असल्याची घोषणा करताना मॉल्स आणि मंदिरे खुली करण्याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. यावरून, मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे.

सगळे खुले केले, मग मंदिर का बंद

मुंबईत जरी निर्बंध शिथिल केले असले तरी देखील देवळं अजूनही बंद आहेत. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरुन ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल

तुषार भोसले यांनी ट्विट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे. मंत्रालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या आणि मंत्रालयातील फायलींमध्ये दारु धार्जिणी धोरण असल्याचा घणाघात तुषार भोसले यांनी केला आहे. या सरकारने मंत्रालयाचं रुपांतर मदिरालयात केलय. मग देवालय कशी उघडणार, अशी विचारणा करत ठाकरे सरकारने मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.

दरम्यान, आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. मंदिरे खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुले झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी यापूर्वीही केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आणीबाणी लावा! महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याने लिहिलं चक्क मोदींना पत्र

News Desk

‘आकडेवारीची तलवारबाजी केंद्र सरकार करत असते’, संजय राऊतांचा अग्रलेखातून सवाल!

News Desk

यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास! अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय

News Desk