HW News Marathi
महाराष्ट्र

‘संयम सोडू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यापाऱ्यांना आवाहन!

मुंबई। ज्या ठिकाणी निर्बंधामध्ये शिथिलता द्यायची त्या ठिकाणी ही शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ कोणी लाडका आहे आणि कोणी दुश्मन आहे असं नाही, असं सांगतानाच राज्यातील नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो संयम सोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

कृपया संयम सोडू नका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल सुद्धा कधी सुरू होणार?

लोकलबाबतही भाष्य केलं. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले

संकट फार मोठं होतं

कोरोनाकडेही पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे. कोरोनाने आपल्याला काय शिकवलं याचाही विचार केला पाहिजे. अनावश्यक गोष्टी कशा टाळाव्यात, कारण नसताना गर्दी करू नये, या गोष्टी कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत. सर्वजण घरी असताना पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर होते. ते रस्त्यावर होते म्हणून आपण रस्त्यावर येऊ शकतो हे त्यांचं आपल्यावर ऋण आहे. संकट फार मोठं होतं. अजूनही ते रोरावतंय. हे संकट गेलेलं नाही, असं ते म्हणाले.

फक्त सरकारची चमचेगिरी करावी का?

तुम्ही पेगाससवर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, महागाईवर बोलायला तयार नाहीत, मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? तुमची अपेक्षा काय आहे? विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांची फक्त चमचेगिरी करावी का? हे चालणार नाही, असा इशारा देतानाच विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून देशाचं काम करावं ही आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. विशेषता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर. पेगासस हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यावर बोलणार नाही हे किती काळ चालणार. त्यामुळे कोर्टात न्याय मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असं ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंबाबत आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

News Desk

अंगरक्षक गोविंदाच्या निधनाने भावूक झालेल्या पंकजा मुंडेंची पोस्ट !

News Desk

“हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही वारसदार आणि तुम्हीच…”, पडळकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

News Desk