HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांनी उपस्थित केला भाजपच्या संस्कारांवर प्रश्न!

मुंबई | केंद्राच्या ३ कृषी कायद्यावरुन देशात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन गेले अनेक दिवस-महिने सुरु आहे. त्यात काही सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटमुळे आणखी एक वाद निर्माण झाला. सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. देशमुख यांनी हे जाहीर केल्यानंतर भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत देशमुख यांची कोरोनावरून टिंगल उडवली. भातखळकर यांनी केलेल्या ट्विटवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांचे संस्कारांवरच बोट ठेवलं आहे. रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्यात ट्विटरवर वॉर सुरु झाले आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील क्रीडा आणि कला क्षेत्रातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केलं होतं. सेलिब्रिटींनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्याचा सूर सोशल माध्यमांवर उमटला. काही जणांच्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत काँग्रेसनं ट्विट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल, असं जाहीर केल्यानंतर भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. भातखळकर यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत रोहित पवारांनी भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “विद्वान व्यक्ती नम्र असते अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं खळखळ करते! भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना करोना झाला, तेव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपाचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत, पण करोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत,” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते भातखळकर?

“राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्या देशहिताच्या ट्विटची देखील आम्ही चौकशी करू, अशा प्रकारचं मोठं व घाणेरडं वक्तव्य केलं आहे. मला असा प्रश्न पडला आहे की, करोना अनिल देशमुखांना झाला आही की त्यांच्या मेंदूला? राजकारणासाठी द्वेष व मत्सरापोटी अशा प्रकारचं घाणेरडं काम राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्राची जनता येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र व संपूर्ण देशाच्या हिरोंविरोधात अशा प्रकारचं बोलल्याबद्दल धडा शिकवेल,” असं भातखळकर म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राचा राज्यांना लस देताना आखडता हात, राजेश टोपेंचा गंभीर आरोप

News Desk

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात 16 जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार!- बाळासाहेब थोरात

News Desk

PandharpurElection : आघाडी पिछाडीचा खेळ सुरुच, समाधान आवताडे ८व्या फेरी अखेर आघडीवर!

News Desk