HW News Marathi
महाराष्ट्र

आंबिल ओढ्याच्या कारवाईवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे। पुणे शहरातल्या आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. कारण या कारवाईनंतर पुणे मनपा किंवा आयुक्त त्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर स्थानिक रहिवाशांचा चांगलाच रोश पहायला मिळाला होता. या सगळ्या घटनेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपात जुंपलेली देखील आपण पाहिली, आणि या सगळ्या घटनेवर पालकमंत्री अजित पवार यांनी आज (२जुलै) प्रतिक्रिया दिली आहे.

आंबिल ओढ्याची खूप चर्चा झाली. मात्र माझा काही दूरपर्यंत देखील या प्रकरणाशी संबंध नाही. तो प्रशासनाचा निर्णय होता, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. मी माझ्यावरची जबाबदारी कधीच झटकत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. माझी बहिण तिथे गेली तर पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उगाच काय राजकारण करता?, अशी संप्तत प्रतिक्रिया अजित पवारांनी आज दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची स्थानिक रहिवाशांना भेट

पुण्यातील आंबिल ओढ्यातील काही नागरिकांची घरं पाडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा; पंकजा मुंडेंची मागणी

Aprna

फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमचे हे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु, आठवलेंचा गौप्यस्फोट

News Desk

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

News Desk