HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार आणि आमदारांच्या घोटवलेल्या पगारांचे केंद्राने, राज्याने काय केले? – उदयनराजेंचा सवाल

सातारा | राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते कुठे गेले? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलेच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

खासदार आणि आमदारांचे तुम्ही दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले त्याचं केंद्र आणि राज्य सरकारनं काय केलं ते गेले कुठे? दिवस रात्र एकच झाली आहे. आम्हाला बेड पाहिजेत, ऑक्सिजन पाहिजेत, असे फोन येतात. माझा एकच प्रश्न हे घोटून घेतलेले पैसे गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत. याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे. आता लोकांनी जाब विचारणं गरजेचे आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता कुणाला काय CD लावायची, ती लावावी”, भाजपचे खडसेंना थेट आव्हान

Ruchita Chowdhary

ईडीकडून नोटीस येण्याआधी भाजप नेते आधीच नाव घेत होते’- संजय राऊत

News Desk

#CoronaVirus : पश्चिम-मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

swarit