HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीकडून नोटीस येण्याआधी भाजप नेते आधीच नाव घेत होते’- संजय राऊत

मुंबई | सरकार मधले अनिल परब हे महत्वाचे मंत्री, त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे महत्वाचे देते शिवसैनिक आहेत.नोटीस पाठवण्यास संदर्भात टायमिंग पाहिलं. नोटीस मिळण्याआधी भाजपचे अनेक नेते अनिल परब यांचे सातत्याने नाव घेत होते.

ED ने त्यांचा एक डेस्क ऑफिसर भाजपच्या कार्यालयात ठेवलाय किंवा भारतीय जनता पक्षातील कोणीतरी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफिसर म्हणून बसला असेल

आम्हाला नाही माहित पण यांना कसं कळलं की अनिल परब यांना नोटीस येणार आणि त्यांना त्या दिवशी चौकशी ला बोलावलं जाणार? किरीट सोमय्या, चंद्रकांत दादा पाटील यांना माहीत आहे हे काय चाललं आहे.

येऊ देना नोटिसा… ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत राजकारणामध्ये अशी प्रेमपत्र काम करणार्‍या माणसांना येत असतात.

आमच्यावर कायदेशीर कारवाई होते त्यासाठी आम्ही काय धमक्या देणार नाही प्रधानमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना आणि कायदेशीर कारवाईला पूर्णपणे सामोरं जाऊ यंत्रणेला सहकार्य करून अनिल परब हे त्यांच्या उत्तर देतील ते समर्थ आहेत. अशा नोटिसा आमच्या घरी देखील बऱ्याच आहेत त्यात विषय देत नाही चौकशीला या असं सांगतात.

अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत

अशाने शिवसेना सरकार कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेले डोमकावळे आहेत त्यांचा काही फायदा होईल… असं काही होणार नाही.असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत कायदेशीर की बेकायदेशीर सगळ्याच प्रकारचे आहेत.

तुम्ही आमची चिंता अजिबात करू नका अनिल परब यांची ही चिंता करू नका. केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झालेली कायदेशीर कारवाई होती ती देशात कोणावरही होऊ शकते.जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता ठामपणे बेजबाबदारपणे वागत असे त्याच्यावर कारवाई होऊ शकते

महाराष्ट्राचे एखाद्या मंत्र्याने अशी भाषा वापरली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते माझ्यावर ही कारवाई होऊ शकते

कायद्याचे उल्लंघन न करणार्‍यां वर कारवाई करायची नाही तर मग काय आरती करायची का?जोरदार पदावरील व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब असतं अशा लोकांनी जास्त जबाबदारीने वागायचं असतात

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे खूप लोक आहेत

मुख्यमंत्र्यांच्या जवळ एक नेता नसतो अनेक नेते आहेत अनिल देशमुख देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत पवार साहेबांच्या जवळचे आहेत. नोटीस आम्हालाही आली होती इशाऱ्या इशाऱ्याची आम्ही पर्वा करत नाही. तुमच्या हातात चौकशीची शस्त्र आहे ती कमी वापरा.अमानुष हल्ला हरियाणाच्या सीमित झाला

हा सैतानी कारभार होता


मोदींच्या उपस्थितीत जलियांवाला बाग संदर्भात कार्यक्रम सुरू होता तेव्हा चा हल्ला झाला. या शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत सरकारला मोजावी लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधुदुर्ग येथे उभे राहणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

News Desk

राज, उद्धव यांची पुढची पिढी एकत्र

News Desk

महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचा मुहूर्त लांबणीवर

News Desk