HW News Marathi
महाराष्ट्र

तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गला २५ कोटी जाहीर

मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात हैदोस घातला होता. त्यामुळे खूप नुकसान झाले होते. अशातच रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आणि तात्काळ १०० कोटींची मदत जाहीर केली होती. रायगड जिल्ह्यात जितकी हानी झाली तितकीच सिंधुदुर्ग , ठाणे, पालघर या जिल्ह्यात देखील झाली.

दरम्यान, नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. आणि तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तसेच, ठाणे, पालघर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तसेच, मदतकार्य करताना प्राधान्य ठरवा,लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा,पंचनामे तातडीने करून पाठवा. दळणवळण, रस्ते दुरुस्ती आणि वीज पुरवठा सुरु करा. लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार, मच्छीमारांना तातडीने मदत करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल  2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

मानवी मनोरे न रचण्याचा सरकारचा आदेश!

News Desk

कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करणार

News Desk