HW News Marathi
Covid-19

१२ वीच्या परीक्षेबाबत लवकर निर्णय घेणार, केंद्राने यात लक्ष द्यावं

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन १ जूननंतर उठणार का? काय सरकार निर्णय घेणार या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३० मे) जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी त्यांनी बोलताना सुरुवातीला एक महिन्यांनंतर आपण बोलत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लोकांचे कौतुक आणि आभार मानले कारण दीड वर्ष लोकांनी स्वतःवर जो संयम ठेवला आहे त्याचं कौतुक केलं. तसेच, महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा गावाकडे जास्त रूग्ण वाढत असल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच, १० वीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, १२ वीच्या परीक्षेबाबत लवकर निर्णय घेणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ऑफिससाठी जसं वर्क फ्रॉम होम आहे तसं शिक्षणासाठी काही करता येईल का यासाठी उद्योगपतींन सोबत बातचीत करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

  • १० वी परीक्षा रद्दच
  • १२ वी परीक्षेबाबत लवकर निर्णय घेणार
  • केंद्राने यावर काही निर्णय आणि उपाय द्यावा
  • माझा डॉक्टर ही मोहीम अजून जोमाने राबवा
  • ऑक्सिजन निर्मितीची राज्याची क्षमता आता १२०० मेट्रिक टन
  • कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही
  • कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक
  • खबरदारी घ्या, लहान मुलांची काळजी घ्या
  • राज्यात लसीचा तुटवडा
  • मात्र, जूनपासून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार
  • लस पुरवठा वाढला की २४ तास लसीकरण
  • राज्यात २ कोटी २५ लाख लोकांचं लसीकरण पुर्ण
  • १८+ वयाच्या ६ कोटी लोकांचं लसीकरण करणार
  • महाराष्ट्र सुरक्षित रहावा यासाठी बंधनं
  • महाराष्ट्रात हवा तसा कोरोना आटोक्यात आला नाही
  • कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक
  • नव्या स्ट्रेनचा फैलाव वेगाने होत आहे
  • कडक नाही मात्र निर्बंध कायम राहणार
  • ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक कायम
  • नवे स्ट्रेन घातक, हे स्ट्रेन काबूत नाही
  • नव्या स्ट्रेनवर अजून नियंत्रण नाही
  • तिसरी लाट येणार पण कधी ते माहित नाही
  • ब्लॅक फंगसचं नवं संकट
  • म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत आहे
  • म्यूकरमायकोसिसवर टास्क फोर्स काम करत आहे
  • कोरोना काळात घरकामगार, मजूर यांना निधी
  • घरेलु कामगारांच्या खात्यात ३४ लाख जमा
  • ३३०० कोटींची तरतूद
  • राज्यात दरवर्षी वादळ आणि त्याचं संकट आहे, त्याचा सामना नागरिकांनी आणि प्रशासनाने उत्तम केला
  • किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करणार
  • राज्य सरकार केंद्राकडे मदत मागणार
  • नुकसान ग्रस्त लोकांना मदत करण्यास सुरुवात
  • केंद्र सरकार वादळग्रस्त लोकांना मदत करणार
  • भूकंपरोधक घरे बांधण्याचा प्रयत्न
  • NDRF च्या नियमांत बदल करणे आवश्यक
  • कोरोना काळातील लोखाजोगा तुमच्यासमोर मांडत आहे
  • कोरोना काळात मोफत धान्य वाटप
  • ५५ लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या
  • गरिबांचे हाल होऊ नयेत याची खबरदारी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मूळगावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी प्रवास

News Desk

माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा !

News Desk

कुंभमेळ्यातील वाढत्या कोरोनाची मोदींनी घेतली दखल, कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचे केले आवाहन

News Desk