HW News Marathi
महाराष्ट्र

आरोपीला माफ केले जाणार नाही, संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया 

मुंबई | आज (२८ फेब्रुवारी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्यांचं नाव समोर आलं ते शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या विषयावर भाष्य केले आहे.

न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. यात आरोपीलामाफ केलं जाणार नाही. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसा होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

तर यावेळी, संजय राठोड यांनीजे पत्र लिहिलं ते देखील वाचून दाखवलं. संजय राठोड यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे, “मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत खरं बाहेर यावं. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणं नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.”

पुढे मुख्यमंत्री असं देखील म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं म्हणजे न्याय देणं असं होत नाही. ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा होती, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव-पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री

News Desk

OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार; फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात !

News Desk

“केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत तर स्वागतच”

News Desk