HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे म्हणतात, मी चुकलो तर त्याला जबाबदार पवार…

पुणे | आज (25 डिसेंबर) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सभा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.यावेळी बोलताना शरद पवारांनी कमीत कमी आमदारांत राज्यात चमत्कार केला, त्यामुळे जागा जास्त म्हणून सगळीकडे तुमची पिकं नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला

“आपण जगात गोडवा वाटण्याचं काम करता. माझ्या बोलण्यात काही कमी आलं तर शरद पवारांना जबाबदार धरावे,असे सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले .दिलीप वळसे पाटलंनी मला सांगितलं आहे कि यापूर्वी याच व्यासपीठावर कोण तरी म्हटले होते शरद पवारांचे बोट धरुन मी राजकारणात आलोय. त्यामुळे पवार साहेबांनी एक चूक केली ,दुसरी केली असं मी म्हणणार नाही, पण हे एक चांगले व्यासपीठ आहे”, असं नरेंद्र मोदींचे नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टीका केली.

शरद पवार म्हणजेच माझ्या वडिलांचे मित्र. त्यांनी मला आदेश दिला आणि मुख्यमंत्री झालो अशी जाहीर कबुलीसुद्धा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महाविकासाआघाडीचे सरकार बनवण्यात शरद पवार आणि संजय राऊत यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पडली. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबाचें वचन पूर्ण करण्यात शरद पवार यांनी मोलाचा वाट उचलला याची जाहीर कबुलीच आज त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विदुषकाला पाहायला जशी गर्दी, तशी राज ठाकरेंच्या सभेला गर्दी”, RPI नेत्याची राज ठाकरेंवर टीका

Aprna

 पुलवामाच्या गुन्हेगारांना  कशी, कुठे, शिक्षा द्यायची ते आमचे जवान ठरवती !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk