HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरु, लॉकडाऊनवर चर्चा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (३० मे) पुन्हा बैठक सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये वर्षा बंगल्यावर सुरु आहे. या बैठकीत केंद्र सरकारकडून पाचव्या लॉकडाऊनची घोषण केली असून हा लॉकडाऊन हा ३० जूनपर्यंत वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमधील शिथिलता यावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. यानंतर आता राज्यातही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे.

या आठवड्यातली मुख्यमंत्री आणि पवार यांच्यातली ही दुसरी भेट आहे. याआधी शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला होती. यावेळी देखील दोघांच्या भेटीवर तर्कवितर्क काढण्यात आले होते.

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोना आज २ हजार ९४० रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९९ रुग्णांचा मृत्यू झाला, पण ८१ मृत्यू हे मुंबई महानगर प्रदेशातील आहे, यामुळे राज्यात चिंतेचीबाब आहे. त्यातील आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६५ हजार १६८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, फडणवीसांनी डिवचले

News Desk

म्युकरमायकॅासिस म्हणजे काय ? लक्षण काय आहेत ?उपचार कोणते ?

News Desk

सीरमची कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी 

News Desk