HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन १ वर्ष झाले. या वर्षपूर्ती दिनानिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची अभिनंदन मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर मोठं राजकारण पेटलं होतं. भाजपकडून मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं झाली. ही आंदोलन सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्यावरून डिवचलं होतं. राज्यपालांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून उत्तर दिलं. “हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी पत्रं लिहून राज्यपालांवर टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर तुम्ही हिंदुत्व सोडलंय का?, असा सवाल राज्यपाल आणि भाजपकडून केला जातोय. त्यावर तुमची काय भूमिका आहे?, असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर, हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला.

मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी ९२-९३ साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतं आहे.

राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही, असं सांगतानाच मग हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे काय? त्याने कोरोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका… आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका.

पहिलं या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही कधीच सोयीचं हिंदुत्व घेतलं नाही. जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, जनतेच्या हिताचं असेल ते कर. मग ते आपल्याला गैरसोयीचं असलं तरी जनतेसाठी कर! राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात ठाकरे सरकारने ‘स्टॅम्प ड्युटी’मध्ये दिली ऐवढी सवलत

swarit

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

News Desk