HW News Marathi
महाराष्ट्र

“मी शांत आहे, संयमी आहे पण नामर्द नाही”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सणसणीत जवाब

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीने केलेल्या छापेमारीवर भाष्य केले. तसेच, इतर अनेक टिकांवर देखील त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तरे दिली आहेत.

“मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे. तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला दिला

“तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू”

“तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“सूडाने वागायचंच आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका,” असेही उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलं.

“भलेभले अंगावर आले, पण काय झालं?”

“ईडीसारख्या संस्था… ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करतात. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत,” असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

“मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की, तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत आहे, तेज आहे. जेव्हा संकटं आली, आपत्त्या आल्या, भलेभले अंगावर आले पण काय झाले? असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल, कुणी डिवचेल तर काय होतं याचे दाखले इतिहासात आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. अशी संकटं अंगावर घेऊन ती पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढं जात राहिला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

तुमच्याकडं सूडचक्र आहे तर आमच्याकडं सुदर्शनचक्र

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीत तर तुम्ही आम्हाला हिंदुत्ववादी म्हणता ना मग ठीक आहे. तुमच्याकडं सूडचक्र आहे तर आमच्याकडं सुदर्शनचक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. सूडाने वागायचं आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे, हे असं विकृत बुद्धीचे चाळे करु नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका. राजकारण राजकारणासारखं करा. तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करुन अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कुणाकडे राहात नसते. जनता ही मोठी ताकद आहे आणि खरी सत्ता ती असते. ती आमच्यासोबत आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडीची ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

News Desk

महाराष्ट्राला लागलेली भाजपा -सेनेची कीड ठेचून काढा – धनंजय मुंडे

swarit

जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

News Desk