HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या परिवारापुरते चालणारे पक्ष आहेत !

बुलढाणा | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या परिवारापुरते चालणारे पक्ष आहेत. मात्र, शिवसेना- भाजप ही देशासाठी चालणारी पक्ष आहेत” असल्याचे शहांनी म्हटले. महाष्ट्रातील जनता ठरवेल की, त्यांना देश चालविणारा पक्ष हावा आहे की, त्यांचे कुटुंबे चालविणार, असे म्हणत शहा गांधी आणि पवारांवर टीकास्त्र सोडले.

भाजप महाराष्ट्रच्या विकासाठी काम करत आहे तर दुसरीकडे काग्रेस – राष्ट्रवादी हे त्यांच्या मुलांच्या विकाससाठी काम करत आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, यांच्या मुले सर्व जण विधासनसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. का बरे अजून कोणाकडे टॅलेंट नाही, मला सांगा की, या परिवारवादी पक्षा महाराष्ट्रात विकास कामे करतील का?, ते त्यांच्या परिवार मोठा आणि समृद्ध करण्याचे काम करण्यात व्यस्त आहेत. त लोक महाराष्ट्र मोठा आणि समुद्धी करण्याचे काम करतील का?, असा सवाल शहांनी उपस्थित करत पवारांवर निशाणा साधला.

मताच्या राजकारणसाठी कलम ३७० हटविण्यासा काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुन्हा सरकार आल्यानंतर त्यांनी ५ ऑगस्टला काश्मीरमधील कलम ३७० हटविले. काश्मरीमधील दहशतवाद्यामुळे ४० हजार लोक मारले गेले. मतांचे राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्ष काश्मीर मधील कमल ३७० हटविण्यास विरोध करत होती. मात्री, भाजप मतांचे राजकारण करत नाही, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. असे शहा म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रचाराकरण्यासाठी देतील तेव्हा द्यांना विचारा की, तुम्ही काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या समर्थनात आहात की नाही, असा सवाल विचारा असे आव्हान देखील शहांनी जनतेला केले. पुढे म्हणले की, महराष्ट्रा आणि कलम ३७०चा काय संबंध आहे. केवळ महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील जनात काश्मीर भारताच्या अखंडातेशी जोडला राहिला पाहिजे ही इच्छा होती.देशातील जनतेची ही इच्छा पंतप्रधा नरेंद्र मोदींनी पूर्ण केली असल्याचे सांगत शहांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० लाखांचा बूस्टर डोस अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्था मंदावलेलीच, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

अंजली दमनीयांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

News Desk

शरद पवारांना नास्तिक आहेत म्हटले…!, राज ठाकरेंनी टोला लगावला

Aprna