HW News Marathi
महाराष्ट्र

रावसाहेब दानवे अन् अब्दुल सत्तार यांच्या गळाभेटी; राजकीय चर्चेला उधाण

मुंबई | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री मंत्री अब्दुल सत्तार या दोघांमध्ये दिल्लीत भेट झाली असून या भेटीदरम्यान दानवे आणि सत्तार यांच्या गळाभेटीचा फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे राज्याचे राजकारण वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अब्दुल सत्तार हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. सत्तारांनी आज (५ जानेवारी) दानवेची भेट दिली आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला, तर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकते,” असे वक्तव्य केल्यामुळे सर्वांचे भुवया उंचावल्या आहेत. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे चंद्रकांत खैरेंनी त्यांच्यावर टीका केली. 

सत्तारांना दानवेच्या भेटीसंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातमध्यील जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती, त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, “सर्व विषयांवर बोलण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. मी केलेले वक्तव्य हे माझे वैयक्तिक असून त्याचा पक्ष किंवा सरकार म्हणून नाही, ” असे ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी असून त्यांनी राज्याचे नेतृत्त्व ते उत्तर प्रकार करत आहेत. त्याचप्रमाणे नितीन गडकरी महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये युतीचा पूल जोडण्यांचे काम त्यांनी मनावर घेतले तर नक्कीच उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जातील. आणि शिवसेना-भाजप युती घेण्याचा निर्णय शेवटी उद्धवसाहेबच घेऊ शकतात,” असे सत्तार म्हटले.

चंद्रकांत खैरेंची सत्तारांवर टीका 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच युतीचा निर्णय घेतील. त्यामुळे सत्तार यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत खैरेंनी सत्तार यांना फटकारलं आहे. युतीविषयी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच विधान करू शकतात. तसेच युतीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनाच आहे. युती होणार की नाही याबद्दल हे दोनच नेते बोलू शकतील. त्यामुळे मंत्री असताना असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सत्तार यांनी ओघाओघाने तसे विधान केले असेल. परंतु, त्यांना तो अधिकार नाही, अशा प्रकारे खैरेंनी सत्तार यांचा समाचार घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांबद्दल टीका करण्याआधी लाज बाळगा, आव्हाडांचे पाटलांना सडेतोड उत्तर

News Desk

विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे महत्त्वाचे! – आदित्य ठाकरे

Aprna

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान! – दादाजी भुसे

Aprna