HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांबद्दल टीका करण्याआधी लाज बाळगा, आव्हाडांचे पाटलांना सडेतोड उत्तर

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावं असं वाटलं. दुसरीकडे आता 4 दिवसांनंतर शरद पवार यांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

शरद पवारांबद्दल चंद्रकांत पाटील दौऱ्यावर उशीर झाला असे म्हणाले, जणूकाही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत. आठवण म्हणून सांगतो… 1972 साली दुष्काळ पडला तेव्हा गावा-गावात पोहचले शरद पवार… 1993 चा बॉम्बस्फोट झाला आणि त्याचा धुराळा खाली उतरत नाही तर पवार साहेब जागेवर पोहचले. खिल्लारीचा भूकंप झाला… तिथल्या जिल्हाधिका-यांना कळण्याच्या आत पवार साहेब खिल्लारीत पोहचले.तेव्हा आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं.

पण जेव्हा कोल्हापूर मध्ये पूर आला तेव्हा भाजपाचे नेते कुठे होते याचा शोध तर घ्यावा. त्याही परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब 2 फूट पाण्यामधून चालत अंगठ्याला जखम असताना देखील गेले.आपल्या 50 वर्षांच्या कारकर्दितीत जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर नाही तर देशावर प्रसंग ओढवला तेव्हा मदतीला धावणारे शरद पवार आहेत. अगदी गुजरातच्या भुकंपात सुद्धा त्यांनी अभुतपुर्व काम केल आणि म्हणुनच स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख बनवल.

आपले हेलिकॉप्टर गारा पडतायेत म्हणुन खाली उतरल्यानंतर त्याच अवस्थेत चिखल तुडवत द्राक्षे आणि डाळींबांच्या बागांमध्ये जाणारे शरद पवार साहेबच होते. तेव्हा त्यांना दौ-यावर उशीर झाला असं म्हणण हे आपल राजकीय प्रगल्भत्व सिद्ध करतं.

कोव्हीड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वत:ला दाराच्या आत न-ठेवता, वय वर्षे 80 असताना देखील महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, मुंबईमध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी न-घाबरता बाहेर पडणारे ते एकमेव नेते आहेत. आजही सकाळी 8 वाजल्यापासून लोकांना भेटण्याची त्यांची दिनचर्या खंडीत झालेली नाही.म्हणुनच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेबांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत-कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे”

News Desk

‘अमृता फडणवीस कोण आहेत ?’, किशोरी पेडणेकरांचा टोला

News Desk

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk