HW News Marathi
महाराष्ट्र

दोन महिन्यांपासून कुठे आहे, पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई। “आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही”, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दानवेंनी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे आले होते. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

“मुख्यमंत्री बोलतात आपले कुटुंब आपली जबाबदारी, तर मग मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचे जवाबदार आहेत की बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे? आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही”, असे दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बिना कुठे राज्य चालत का?,तीन महिन्यात शिवसेनेच्या कोण्या मंत्र्याला चार्ज दिला असता तर राज्याचा राज्यकारभार नीट तरी चालला नसत का?, असा सवाल दानवेंनी मुख्यमंत्र्यांना केला.

“मुख्यमंत्री परभणीला आले. त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितलं कर्ज काढून हॉटेल बांधले. बँखवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात,” असे देखील दानवे म्हणाले

दानवेंनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत म्हटले, “कोरोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवे होते. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावेळी मोदींनी कोरोना काळात मोफत अन्नधान्य दावे, अशी सूचना त्यांनी सांगितले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे नातजावई डाॅ.आनंद तेलतुंबडे यांचे एनआयएसमोर आत्मसमर्पण !

News Desk

राज्यात ५ जिल्ह्यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय  

News Desk

MPSC परीक्षेची नवी तारीख ठरल्यानंतर सरकारमधील ‘या’ नेत्याने केली नवी मागणी

News Desk