HW News Marathi
Covid-19

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु, आता पुन्हा लॉकडाऊन नाही !

मुंबई | राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या काही गोष्टींवर भाष्य केले आहे. राज्यातील अनलॉकच्या प्रक्रियेबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले कि, “राज्यात आता ‘मिशन बिगिन अगेन’च्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. उलट जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा कशा सुरु करता येतील याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. विशेषतः जिम्स, शॉपिंग मॉल्स सुरु करण्याबाबत निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.” मात्र, “मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील”, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

क्वारंटाईन सेंटर्ससाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार !

आरोग्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये घडणाऱ्या प्रकाराबद्दल देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये घडणाऱ्या घटना अतिशय निंदनीय आहेत. म्हणूनच आता क्वारंटाईन सेंटर्ससाठी सरकारकडून लवकरच काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील. यानुसार, क्वारंटाईन सेंटर्समध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे वॉर्ड्स करण्यात येतील. यासाठी काही नियम बदलण्याची आवश्यकता असल्यास आम्ही ते निश्चित बदलू. त्याचप्रमाणे, अशा निंदनीय घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई देखील करू”, असे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे.

कोरोना चाचण्यांवरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवर भाष्य

“विरोधी पक्षाने त्यांचे काम करावे, त्यात राजकारण नको. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी जो सल्ला दिला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. टेस्टिंग लॅब्सची संख्या वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक जिल्ह्यात अँटिजेन टेस्टची सुविधाही वाढवत आहोत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात टेस्ट्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. हि प्रक्रिया पारदर्शी आहे. त्याचमुळे, खरे आकडे देखील समोर येत आहेत. राज्य सरकार ICMR च्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहे”, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८ वर्षावरील सगळ्यांनाच कोरोना लस द्या, IMAची मोदींना पत्रातून विनंती

News Desk

थोडी माणुसकी असायला हवी होती, अजित पवारांची व्हेंटिलेटर्सच्या प्रश्नावर खंत

News Desk

खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करा! – अजित पवार

Aprna