HW News Marathi
देश / विदेश

आम्हीच बाबरी मशीद पाडली, हे भाजप हिंमतीने मान्य का करत नाही ?

नवी दिल्ली | “बाबरी मशीद विध्वंसाप्रकरणी कारसेवकांना दोष देण्यापेक्षा आम्हीच बाबरी पाडली, असे भाजप का सांगत नाही”, असा बोचरा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘द इकॉनॉमिक टाईम्स’शी बोलताना संजय राऊत यांनी बाबरी मशीद विध्वंसाप्रकरणी भाष्य केले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्या राम मंदिराचा वाद मिटला आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडणार आहे. त्यातच आता संजय राऊतांनी हे भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी यावेळी बाबरी मशीद विध्वंसाप्रकरणी सुरु खटल्यावरही भाष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या (२२ जुलै) अग्रलेखात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. “लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना या वयात सीबीआय न्यायालयात ओढले जात असताना देखील केंद्र सरकारने हा खटला सुरु का ठेवला ? ते मला कळत नाही. हा प्रकार अक्षम्य आहे”, असे संजय राऊत या मुलाखतीत देखील म्हणाले.

“भाजप एक पक्ष म्हणून तसेच या पक्षाचे वरिष्ठ नेतेही किमान आता तरी बाबरी मशीद विध्वंसाप्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याची हिंमत का दाखवत नाहीत ?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाडक्या अभिनेत्यासाठी बनविली चक्क ५७ किलोची इडली!

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

Gauri Tilekar

उत्तर प्रदेशामधील शाळेत १ लिटर दूध ८१ मुलांमध्ये वाटप

News Desk