HW News Marathi
देश / विदेश

उर्मिला मातोंडकरांचा मोदींवर निशाणा!

मुंबई | १४ आणि १५ डिसेंबरला राज्याचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. एकीकडे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने २ दिवसाचेच अधिवेशन ठेवल्याने महाविकास आघाडी सरकरावर तोफ डागली होती. त्यानंतर केंद्राने संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्दच केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारवर सध्या जोरदार टीका होत आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती. केंद्राने हा निर्णय परस्पर घेतल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी काय ट्विट केलं?

उर्मिला यांनी ट्वीट केलं आहे, ‘राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश खुला आहे. खूपच लोकशाही आहे (टू मच डेमोक्रॉसी)’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.

एकीकडे केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द झालेलं असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात विरोधी पक्षानं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप केले. मात्र, सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोडून काढले. सभागृहाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

IMA चे माजी अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा चित्ररथ सादर होणार

News Desk

ट्विटरवर जगात सर्वाधिक ‘फेक’ फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे!

News Desk