HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील- संजय राठोड

औरंगाबाद | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपलं वनमंत्री पद गा गमावलेले शिवसेना नेते संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देण्याची चर्चा सुरु आहे. यावर संजय राठोड म्हणाले की, माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

“मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही”, असं संजय राठोड यांनी सांगितलं.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काही विधान केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नाही, असं संजय राठोड म्हणाले.

संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला होता. यानंतर संजय राठोड यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांच्या घराबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मराठा आरक्षणासंबंधी दिल्लीच्या वकिलांशी अशोक चव्हाणांनी केली चर्चा

News Desk

कोटक महिंद्रचे सीईओ यावेळी केवळ १ रुपये पगार घेणार !

News Desk