HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून १० हजार रुपये जमा होणार – विजय वडेट्टीवार

नागपूर | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्यापासून (३० जुलै) ही १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केले आहेत. हे १० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल अहवाल देण्यास सांगितलं आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसात अहवाल मिळावा या सूचना दिल्या आहेत. या पावसामुळे ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. हा प्राथमिक अंदाज आहे. नांदेडमध्ये ८० हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तिथे एकाच दिवशी १६६ मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर ४०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयनाच्या परिसरात ४८ तासात १०७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि १७ टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल. हा सर्व परिसर इको सेन्सिटीव्ह झोन समजून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबरोबर तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावं

पूरस्थिती आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम तातडीने यावी. आम्ही पत्र पाठवत आहोत. नुकसान मोठं आहे. त्यामुळे केंद्राने स्वत:हून टीम पाठवावी. नेते, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते फिरत आहेत. त्यांनीही पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती द्यावी. पंतप्रधानांनीही येऊन पाहणी करावी. पंतप्रधानांनी दौरे करावेत. गुजरातमध्ये काही झालं तर ते लगेच जातात. ते देशाचे पंतप्रधान आहेत. आमची इच्छा आहे. त्यांनी सुद्धा कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट आलं ते पाहावं, त्यांना कळेल संकट किती मोठं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

swarit

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच !

News Desk

मातोश्री पाणंद रस्ते व रोहयोची कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत! – संदिपान भुमरे

Aprna