HW News Marathi
महाराष्ट्र

“तो मटन खातोय आणि तुम्ही आम्ही भजे खाण्यातच खूश”, वडेट्टीवारांची विरोधकांवर टोलेबाजी

जालना। जालना जिल्ह्यातील दोदडगाव येथे मंडलस्तंभ अभिवादन आणि सामाजिक न्याय मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांचा धुवा उडवला आहे. “सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करत नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढायला शिकाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ओबीसी हा मजबुतीने उभा झालाय हे चित्र रंगेल, ती ताकद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून निर्माण करायची आहे ” असा टोला त्यांनी लगावला आहे.

तो मटन खातोय आणि तुम्ही आम्ही भजे खाण्यातच खूश

यावेळी वडेट्टीवारांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील टोला लगावला आहे. ओबीसी आरक्षणावर भाजप आक्रमक झाली आहे. “ते ओबीसीसाठी रोज लढताना दिसतात. ओबीसी लढ्याबद्दल ते माझी तारीफ करतात, मी देखील कधी त्यांची तारीफ केली पाहिजे. ते कधी-कधी म्हणतात ओबीसींच्या प्रश्नांवर सगळे मिळून लढू! नाही तरी काय? शिवसेना सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण? भाजपा सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण? काँग्रेस सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण आणि पहिल्या बाकावर कोण हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आम्ही कुठे आहोत? तो मटन खातोय आणि तुम्ही आम्ही भजे खाण्यातच खूश. भजांसोबत मिरची होती आणि त्यामध्ये कांदे होते याचीच तारीफ करतो. ते तुमच्या ताटातील काढून घेत आहेत याचा विचार करणार की नाही? मंत्रीपद काही कुणाच्या बापाची कायमची मिरासदारी नाही. आज आहे उद्या नाही, ज्यांच्यामुळे मंत्रीपद मिळाले त्या समाजासाठी आपण काय करतो हे महत्वाचे आहे. सत्ता कुणाकडे कायम नसते. याची अनेक उदाहरणं आहेत ”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आम्ही फक्त बशा धुणारे झालोय

“सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं? आम्ही फक्त बशा धुणारे झालोय. आम्हाला भजे दिले की, आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खातायेत ना. ज्यांच्यामुळे मंत्री झालो त्यांच्यासाठी खपायला शिकलं पाहिजे,” असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवारांनी ओबीसींच्या सत्तेतील वाट्याबाबत उपस्थितांसमोर आपली मतं मांडली.राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलीय. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 1.0 | पेट्रोल कंपन्यांची दरवाढ सुरूच

News Desk

“…तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, खोतांची परबांवर टीका

News Desk

पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली, तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन!

News Desk