HW News Marathi
महाराष्ट्र

विनोद तावडेंनी केले डॉ. अरुणा ढेरे यांचे अभिनंदन

यवतमाळ | ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तब्बल १७ वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये जानेवारी महिन्यात ११,१२ आणि १३ जानेवारीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पार्थ पवार म्हणतात ,जर काही कृती केली नाही तर हाती काही लागणार नाही!

News Desk

“लवकरच जाहीर सभा घेणार, सभेत मास्ककाढून सर्वचा सोक्षमोक्ष लावणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंसोबत वाद ?

News Desk
मुंबई

माहुल प्रकल्पग्रस्तांचे ‘जीवन बचाव आंदोलन’

swarit

मुंबई | ‘माहुल प्रकल्पग्रस्तांना पुनर्वासित करण्यासाठी घरे आणि पैसा नाही’, असे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात दाखल केले आहे. मुंबईत प्रकल्पग्रस्तांसाठी ७०,००० घरे रिकामी असून सुद्धा सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप करीत माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी विद्याविहार पाईपलाईन येथे ‘जीवन बचाव आंदोलन’ केले होते.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये माहुल व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली तब्बल ७०,००० घरे रिकामी आहेत. त्याचप्रमाणे माहुलमधील प्रकल्पग्रस्तांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी पुनर्वासित करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तरीही सरकारकडून माहुल प्रकल्पग्रस्तांना पुनर्वासित करण्यासाठी घरे आणि पैसा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवाद, आय. आय. टी.मुंबई आणि केईएम रुग्णालयाच्या अहवालानुसार माहुलगाव मानवी वस्तीसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

गेल्या दीड वर्षांत माहुल येथील १०० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर कित्येक जण वायू आणि जलप्रदूषणाने ग्रस्त आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. तरीही सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांकडून ‘जीवन बचाव आंदोलन’ करण्यात आले होते.

Related posts

रेल्वेत मराठी तरुणांना नोक-या मनसेमुळेच | राज ठाकरे

News Desk

खड्ड्यांविरोधात तुर्भेच्या पीडब्लूडी कार्यालयात मनसेचे खळखट्याक

News Desk

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची २४ तास झाडा-झडती

News Desk