HW News Marathi
महाराष्ट्र

‘मनसे-भाजप युतीवर उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही’, विनोद तावडेंचं वक्तव्य

मुंबई | राजकारणापासून काही काळ दुर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी काल (३० जुलै) कल्याण पूर्वेत भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्यांनी भाजप आणि मनसे युती याबाबत वक्तव्य केलं आहे. ‘भाजप-मनसे युती संदर्भात उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही.’ असं विधान माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कल्याणमध्ये केले आहे.

राज्याच्या मुख्य राजकारणातून अलिप्त असलेले विनोद तावडे हे शुक्रवारी कल्याण पूर्वेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘माझ्याकडे पक्षाने हरियाणाची जबाबदारी दिली असल्याने मी सध्या तिकडची जबाबदारी सांभाळत आहे.’ असं विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. त्यामुळे विनोद तावडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तृळात टर्चा सुरु झाली आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना विनोद तावडे यांचे न दिसणे हा चर्चेचा विषय झाला होता. अखेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या याबाबतच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं आहे.’ दुसरीकडे याचवेळी त्यांना मनसे आणि भाजपच्या युतीवर देखील विचारण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपा-मनसे युती संदर्भात उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही.’

दरम्यान, त्यांच्या या विधानमुळे आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राज्यातील सत्ता गमावली. याचवेळी त्यांनी शिवसेनेसारखा आपला जुना मित्र देखील गमावला. अशावेळी राज्यात जर पुन्हा सत्तेच्या दिशेने पावलं टाकायची असल्यास नव्या मित्राचा शोध घेणं हे भाजपसाठी अपरिहार्य आहे. अशावेळी शिवसेनेला टक्कर देणारा एकमेव पक्ष मनसे असल्याचं भाजपला वाटतं त्यामुळेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजप विचार करु शकतं असं त्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ!, दरेकरांची मागणी

Aprna

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

News Desk

त्रिपुरा हिंसाचारांचं अमरावतीत तीव्र पडसाद; बंदला हिंसक वळण, तणावाचं वातावरण

News Desk